Home

आचिर्णे ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे

सुसंस्कृत, स्वच्छ आणि प्रगत आचिर्णे – सर्वांचा सहभाग, सर्वांचा विकास

स्थापना व उद्दिष्टे

सन 1953 मध्ये स्थापन झालेली आचिर्णे ग्रामपंचायत, वैभववाडी तालुक्यातील एक प्रगतशील ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.स्वच्छ आणि प्रगतिशील आचिर्णे घडवणे तसेच गावाचे नाव जगाच्या नकाशवर कोरणे हेच आमचे उद्दिष्ट आहे

शेती व उद्योग

भात, ऊस, नाचणी, काजू, आंबा, फणस यांसह दुधव्यवसाय, कुक्कुटपालन व शेळीपालन हे गावाच्या अर्थकारणाचे मुख्य आधार आहेत.

पुरस्कार व गौरव

आचिर्णे ग्रामपंचायतीला तंटामुक्त पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार, टीबीमुक्त पुरस्कार आणि संत गाडगेबाबा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारी

आचिर्णे ग्रामपंचायत

सन 1953 मध्ये स्थापन झालेली आचिर्णे ग्रामपंचायत, वैभववाडी तालुक्यातील एक प्रगतशील ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. प्रशासनात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची एक कार्यक्षम टीम गावातील विकासासाठी सतत प्रयत्नशील आहे.
गावात महिला स्वयंसहाय्यता गटांचे जाळे मजबूत असून रणरागिणी, सावित्रीबाई फुले, संतोषीमाता, रासाई, महालक्ष्मी यांसारखे गट महिलांना स्वावलंबनाकडे घेऊन जात आहेत. यामुळे गावाच्या आर्थिक व सामाजिक जीवनाला बळकटी मिळते.
आचिर्णे परिसर शेतीप्रधान आहे. भात, ऊस, नाचणी, कुळीथ, चवळी यांसारख्या धान्याबरोबर काजू, आंबा, फणस, नारळ, सुपारी, हळद, कोकम यांसारखी नगदी व फळझाडे येथे आढळतात. शेतीबरोबरच दुधव्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालनही मोठ्या प्रमाणावर चालते.

गावाचे आराध्य दैवत –रासाई देवी

सांस्कृतिक दृष्ट्या गावाचे आराध्य दैवत रासाई देवी असून तिची यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा मानली जाते. तीन दिवस चालणारी ही यात्रा गावाच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवते.

“भक्तांच्या श्रद्धेचे माहेर – रासाई देवीचे मंदिर”

ग्रामपंचायतीचे नेतृत्व कुशल प्रतिनिधींच्या हातात

“स्वच्छ, सुसंस्कृत आणि आत्मनिर्भर आचिर्णे!”